Tuesday, 9 May 2023

सफर नाशिकच्या ऑक्सिजन फॅक्टरीची ...

सफर नाशिकच्या ऑक्सिजन फॅक्टरीची ...



       प्राचार्य . श्रीकांत सोनवणे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ, चुंचाळे , नाशिक येथे सहलीचा लाभ मिळाला आणि सरांनी मला छायाचित्रणा साठी बोलवून येथे छायाचित्रण करण्याची संधी उपलब्ध करून दिली , छायाचित्र काढत असतानाच एक वेगळा अनुभव पांजरापोळ, नाशिक येथे आला ..

           चुंचाळे येथील पांजरापोळच्या ७५० एकरवरील निसर्गाची सफर केली, ही ना विसरणारी  सफर आहे. झाडे, वेली, पशु- पक्षी, सेंद्रिय शेतीसह जैवविविधता पाहून सर्वांचीच मनं आनंदी झाली.....

         शांत वातावरणातला पक्ष्यांचा किलबिलाट हा लहानपणापासून कुठे दूर गेला होता आणि तो पांजरापोळ नाशिक येथील सहलीच्या निमित्ताने पुन्हा अनुभवायला मिळाला .....
           संत ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी मधील - 
" ते असे- पै पारिवा जैसा किरीटी | चढला नभाचिये पाठी । पारवी देखोनिया लोटी | आंगचि सगळे ||
          तसेच संत तुकाराम महाराजांचा अभंग - 
'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरी | पक्षीही सुस्वरे आळविती || 
याची प्रत्यक्ष प्रचिती येथे आले आणि निसर्ग रूप पांडुरंग यांचे दर्शन येथे झाले .

        डॉ. झामरे  आणि पांजरापोळ, नाशिक व्यवस्थापक श्री. विठ्ठल आगळे यांनी पांजरापोळमधील जैवविविधतेची माहिती दिली. 

       त्यानंतर सुरू झाली दोन ट्रॅक्टरद्वारे शिवाराची सफर ... उन्हाची दाहकता असूनही सुद्धा ही ट्रॅक्टरची सफर चा अनुभव हा मजेशीर होता ...

          डॉक्टर झामरे यांनी पांजरापोळ मध्ये गीर, डांगी, पुंगुनूरू आदी देशी गायींचे संगोपन येथे केले जाते , यात अनेक वृद्ध, अनुत्पादक, दिव्यांग, अशा १३०० हून अधिक गायींची आयुष्यभरासाठी घेतली जाणारी काळजी कशी घेतली जाते ते समजावून सांगितले आणि ते ऐकून बघून सर्वचजण गोशाळा व्यवस्थापना चे कौतुक करावे तेवढे कमीच .....
             
             
           सभा मंडपात पांजरापोळ ,नाशिक येथील सदस्यांच्या मार्फत जी जलसंवर्धन यांबद्दल माहिती दिली गेली होती ती प्रत्यक्ष ट्रॅक्टर सफारीतून पाहताना आश्चर्य व्हावे असेच होते . या परिसरातील २६ जलसंवर्धन तळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात

             ज्यात कोट्यवधी लिटर पाण्याचे संवर्धन केले जाते. तळ्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत कमीत कमी चार फूट पाणी शिल्लक राहते. पाणी नियोजनासाठी 'तुषार' व 'ठिबक' सिंचन या परिणामकारण पद्धतीचा अवलंब सुखावणारा ठरला. चोख पाणी नियोजनामुळे परिसरातील तलावांमध्ये बदके, राजहंस व तलावातील माशांचे संवर्धन केले जाते. पांजरापोळ नाशिक येथे सुमारे ३५० पेक्षा जास्त प्रजातींची लाखांहून अधिक झाडांची लागवड केली असून, त्यात अनमोल अशा औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

             पुढचे मार्गदर्शन पाणी आडवा आणि पाणी जिरवा याबद्दल झाले डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविणे, पाणथळ भागातील पाणी वाहून नेण्यासाठी या चाऱ्यांचा उपयोग कसा केला जातो याबद्दलही प्राचार्य. श्रीकांत सोनवणे आणि डॉक्टर झांमरे यांनी माहिती दिली. 

      ३ फूट रुंद, सरासरी ५ फूट खोल अशी एकूण सुमारे ४० हजार फूट लांबीच्या चाय खोदल्या आहेत ते सहलीच्या दरम्यान सांगितले या चाऱ्या जमिनीत पाणी जिरवून जास्तीचे पाणी आपल्या जलसंवर्धन तळ्याकडे नेले जाते , त्यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा आजूबाजूच्या सर्वच शेतकऱ्यांना झाला आहे , हे ऐकून नाशिकच्या या ऑक्सिजन फॅक्टरीमध्ये निसर्गाचा किती उपयोग केला जातो आणि त्याची निगा कशी राखली जाते याची प्रचिती आली ....

      पुढची माहिती ही मधुमक्षिका पालन याबद्दल देण्यात आली मधमाशी पेट्यांच्या सहाय्याने हा प्रकल्प मध गोळा करून विकण्यासाठी नव्हे, तर परागीभवनासाठी चालवला जातो हे सांगितले गेले .. पांजरपोळच्या क्षेत्रातील सूर्यफुल सौंदर्यात भरच घालत नाहीत, तर मधमाशांसाठी परागकण गोळा करण्यास उपयुक्त ठरतात. ज्यामुळे परागीकरणासच चालना मिळते. मोर, पोपट व इतर पक्षी सूर्यफुलाच्या बिया खाण्यासाठी येतात, त्यामुळे एकप्रकारे बर्ड हाऊस तयार झाले १४० पक्षांची पक्षी निवारे या क्षेत्रात तयार झाली आहेत .

 त्याचबरोबर गांडूळखत प्रकल्प, अंतर्गत नर्सरी, मुरघास खड्डे, सौरविद्युत प्रकल्प, पथदीवे, अंतर्गत जलस्रोत, शेण, गोमूत्र, चारा आदी सर्व नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून तयार  करण्यात आलेला नैसर्गिक खत प्रकल्प हा दाखवण्यात  आला .

येथील तयार झालेले पौष्टिक अन्न हे जनावरांना देऊन  उच्च प्रतीचे प्रमाणित सेंद्रिय गाईचे दूध, तूप तयार करण्यास मदत होते .
        यासोबतच आंबा, सीताफळ, पेरू, जांभूळ, चिंच आणि इतर हंगामी फळे, भाज्या येथे वर्षभर उपलब्ध असतात आणि ते विक्रीसाठी बाहेरही दिले जातात हे सांगितले गेले .. इतका मोठा नैसर्गिक खजिना नाशिक सारख्या शहरात असेल असा विचारही कधी केला नव्हता.

  
             ट्रॅक्टर सफारीत पुढचा टप्पा होता तो म्हणजे नाशिकच्या ऑक्सिजन फॅक्टरी मधला मीटिंग पॉइंट
 ... 
        ह्या मिटिंग पॉईंटवर बोगनवेल, इतर फुलझाडे व वृक्षलागवड करून खूप छान प्रकारे सुशोभीकरण केले आहे, आणि विशेष म्हणजे नाशिक पांजरपोळ येथून निसर्गाने दिलेल्या नैसर्गिक साधनांपासून बनविलेली एक मोठी झोपडी आहे. हा एक मोठा सभा मंडप म्हणावा , इथे उन्हाचा क्षीण हा लयास मिळाला कारण जमीन ही शेणाने सावरली होती , थोडी ओलीच होती त्यामुळे येणारा मातीचा सुगंध हा मनाला शांतता देणारा होता , या जागे वर एक फोटो पॉईंट सुद्धा आहे. येथे धान्य व पाणी ठेवल्यास सकाळी मोर, पोपट व इतर पक्षी येतात , आणि त्यांची सभा येथे भरली जाते असे सांगितले गेले , २०० हून अधिक मोरांचा वावर जिथे आहे हे समजल्यावर तर उत्सुकता शिगेला होती मोर बघण्याची , पूर्ण २०० नाही पण जे एक-दोन मोर दिसले , ते दृश्य डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला. 

         
           ट्रॅक्टर सफारी नंतर सहलीच्या शेवटचा टप्पा हा अल्पउपहाराने झाला . निरोप समारंभाच्या वेळी पांजरापोळ, नाशिक येथील सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी केलेल् आदरातिथ्य कौतुकास्पद होत .. या सहलीमध्ये मला छायाचित्रणा ला बोलवून संधी दिली आणि मला पांजरपोळा नाशिक हे बघायला मिळाले आणि अनुभवायला मिळाले ते फक्त प्राचार्य. श्रीकांत सोनवणे यांच्यामुळेच ...

          माझ्या जन्मापासून नाशिक मध्ये पहिल्यांदा शुद्ध ऑक्सिजन हे फुफ्फुसात गेल्याचा अनुभव मी तरी अनुभवला पांजरापोळ, नाशिक येथेच ....



लेखक           : मंगेश मीनासाहेब एस .
सर्व छायाचित्रे : मंगेश मीनासाहेब एस .
+91 8806674257

Monday, 24 October 2016

उरी हल्ला : सर्जिकल स्ट्राईक आणि राजकारण ; सिनेसृष्टी

उरी हल्ला : सर्जिकल स्ट्राईक आणि राजकारण ; सिनेसृष्टी
  
     १८ भारतीय जवान उरी हल्ल्यात शहीद झाले . नामर्दांची औलाद म्हणवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या नामर्दंगी मधून जन्माला आलेल्या काही मुठभर आतंकवादयानि भारतमातेच्या लेकरांची हत्या ती लेकर झोपेत असतांनाच केली .....
     
     गाव खडांगळी , तालुका सिन्नर , जिल्हा नाशिक .... उरी हल्यात शहीद झालेल्या एका वीर सैनिक संदीप ठोक या जवानाच गाव  ....
     
     एस्क्लीझीव्ह आणि ब्रेकिंगच्या विळख्यात हातात कॅमेरा घेवून संदीपच्या २० x ३० च्या घराच्या अंगणात आईचे हृदय फोडणारे चित्कार .... घरट्यातून पाखरू हरवल्याचा जाणीव असलेल्या बापाच्या डोळ्यातलं स्वतःच अनाथ पण .... चांदण गमावण्याची बहिणीची भावना तिची आर्त हक संदीपला किती ही वेळा देवून सुद्धा कधीही न परतणाऱ्या त्या संदीप च्या  अंतःसंस्काराचे त्या न्यूज वाले म्हणवणार्यांसाठी चित्रीकरण करण  नजर मारून , जाणीवा गोठवून स्वतःची लाचारीच समजत होतो ....  क्षमा असावी संदीप .....
   
     उरी घटने नंतर भारताने चोख प्रतिउत्तर सर्जिकल स्ट्राईक च्या मध्यमातून दिल आणि पाकिस्तान च्या फौजेला तोंडघशी पाडल  आणि त्यांच्या तुकड्यांवर वाढणाऱ्या आतंकवाद्यांचा बिमोड करून आपल्या शहीद जवानांना खरी श्रद्धांजली वाहिली , पण वैचारिक पातळी आणि मानसिकता ढासळलेले मुठ भर राजकारणी खरच अभिमान करता येईल अशा गोष्टीवर राजकारण करून सैन्य दलाच्या चिंधड्या करण्यात मौज मानत होते , हा तर सत्तेच्या खुर्चीवर बसून स्वतःचे बुड सुजवून घेणाऱ्या राजकार्नायांचा निर्लज पणाच म्हणावा लागेल , अरे अशा राजकारण्यांना रात्रीच्या सोमरसा च्या बैठकीत ह्या बद्दल राजकारण करण्यापेक्षा रात्रीच्या सोम प्रकाशात सीमेवर छाती तानून उभे असलेल्या सैनिकांच्या पाठीशी बलदंड इच्छा शक्तीने उभे रहा किंवा प्रत्येक राजकारण्याच्या संपत्तीचा १० % तरी खर्च तिन्ही सैन्य दलाच्या विकासाच्या आणि आधुनिकतेच्या मागे लावून तुम्ही तुमची छाती त्या सैनिकां प्रमाणे ५६ इंचाची करून पहा म्हणजे तुम्ही खरे देशभक्त आणि देशहिताचे राजकारणी ठराल यात दुमत नाही हो .... सर्जिकल स्ट्राईक चे राजकारण करण्या पेक्षा देशहिताच्या आणि सर्वात महत्वाच म्हणजे देशाच्या सीमेवर उभे असनाऱ्या सैनिकांबद्दल स्वतःच्या मनाचे सर्जिकल स्ट्राईक करून पहा , नाही तुम्हाला शहीद सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची जाणीव झाली तर यात वावग ठरणार नाही किंवा तुम्हाला कुठलाही कमी पणा येणार नाही हो त्यात .... एकदा तरी लाहौर भारतीय सैन्याच्या हातात देणारे लालबहाद्दूर शास्त्री बना भलेही तुमची मूर्ती लहान नसेलही पण कीर्ती महान होईल आणि राजकारणी असल्याचे तुमचे जीवन सफल तरी होईल यात शंका नाही हो खरच यात शंका नाही ....
   
     ' खंडणीचे ५ कोटी सैनिक सहाय्यता निधी म्हणून मान्य नाही .... ' अतिशय बरोबर विधान आहे हे . प्रथम विरोध मग मांडवलीच कि हो ही ... देशाचे १८ जवान शहीद झाले तरी पाकिस्तानच्या कलाकारांना घेवून बनवण्यात आलेल्या ' ए दिल है मुश्कील ' ह्या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरला स्वतःच्या गालात चपराक का नाही बसावी इतकी विवेक शून्यता किंवा स्वतः चित्रपटा साठी खर्च केलेल्या स्वतःच्या पैशांचा इतका मोह का त्याला पडावा ? १८ शहीद झालेल्या जवानांचे नुकसान देश सहन करू शकतो त्यांचे घरचे सहन करू शकतात पण तुम्ही तुमच्या एका चीत्रपटाचे नुकसान सहन करू शकत नाही ? पण तुम्ही तुमचे स्वतःचे चित्रपट प्रदर्शित न करून पाकिस्तानला त्यांची जागा  तुम्ही नाही दाखवून देवू शकत का ? इतकी का जवानांच्या बलिदानाची घोर उपेक्षा ही करावी तेवढी कमीच हो तुमच्या कडून .. ??? पाकिस्तानातल्या कलाकारांना भारतात आणणारे तुम्हीच त्यांना काम देणारे ही तुम्हीच अरे षंढां नो भारतीय कलाकार तुम्हाला काय फळत नाही म्हणून पाकिस्तानी कलाकार त्यांचा देश चांगला वाटायला लागलाय का तुम्हाला ? चित्रपट प्रदर्शित नसता केला तर निदान शहीद जवानांची लाज राखली असती हो तुम्ही ....
  
     कलाकारांना आणि त्यांच्या कलेला जात धर्म देश काही ही नसतो असे सांगणारे चित्रपट सृष्टीतल्या काही दिग्गज कलाकारांना हा विचार का पडत नाही कि हिंदुस्तान च्या दाही दिशांना छाती ठोक पणे उभा असलेय्या सैनिका ला पण जात धर्म पंथ नसतोतरी तुम्ही त्यांच्या बलिदानाची उपेक्षा करीत आहात ५ कोटी देवून , अरे ते ५ कोटी देवून तुम्ही त्यांचे बलिदान काय विकत घेत  आहात काय ? हीच किंमत लावलीय तुम्ही शहीद जवानांनच्या बलिदानाची ? त्यांच्या घरच्यांच्या अश्रूंनाही चटके दिलेत तुम्ही .... हीच भावना आज जनसामान्यांच्या मना मनात आहे आज तुमच्या बद्दल .... ५ कोटींची मांडवली करण्या अगोदर आमचा अभिमान असलेल्या संदीप ठोक च्या घरी येवून जरा चित्र बघितले असते तुम्ही ते बर झाले असते ... स्वतःचा २५ वर्षाचा मुलगा आईने देशासाठी दिला तिच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिम्मत नाही हिणार तुम्हाला ... वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार देण्याची ही हिम्मत नाही होणार तुम्हाला .... बहिणीचे अश्रू पुसण्याची ही हिम्मत नाही होणार तुम्हाला कारण कि करण ती आई दुखातून सावरलेली नाही महिना उलटून जातोय तरी , वडीलांना विश्वास बसत नाहीये कि माझा २५ वर्षाचा  संदीप शहीद झालाय म्हणून , बहिणीला भावाचा भास झाल्या शिवाय रहावत नाहीये अजून , तरी पण एक अभिमान आहे त्यांना कि संदीप ला आम्ही भारत देशासाठी दिलाय याचा आणि तुम्ही ५ कोटींमध्ये या सगळ्याचं मोल करताय स्वतःच्या स्वार्थासाठी !!! धिक्कार आहे तुमच्या अश्या वागण्याचा जो अशा प्रकारची विकृती मनात ठेवून जगतो आणि वागतो . १८ शहिद जवानां पुढे १ पाकिस्तानी कलाकार असलेला तुम्हाला तुमचा ' ए दिल है मुश्कील  ' महत्वाचा वाटतो का ? पण एक लक्षात ठेवण तुमच्याही  गरजेच आहे , तुमच्या अशा विकृत मनाने दिलेल्या  आणि साकार केलेल्या या तुमच्या विकृत कृतीला संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण देश विसरणार नाही ,इथून पुढचे तुमचे ' ये दिन है मुश्कील ' हे म्हणण्याची वेळ सुरु झालीये ....
   
     आज जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला हा आपला भारत देश आहे , तमाम भारतीय युवकांना इतकेच आवाहन आहे कि , ह्या ५ कोटींची मांडवली करणाऱ्या आणि त्यांच्या सोबत त्यांचे साथ देणाऱ्या स्वार्थी आणि ढिल्या पुल्या षंढ मनोविकृतीना इथून पुढे थारा देवू नका , शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची जाणीव ठेवा हजारो लाखो संदीप ठोक स्वतःच्या विचारांनी आणि हिमतीने स्वतःत उतरावा फक्त देशासाठी आणि देशहितासाठी ... मायावी आणि भुरळ पडणाऱ्या सिने सृष्टीतील कलाकारांना  IDOL आयुष्यात ठेवण्यापेक्षा आपले IDOL हे स्थल सेनेतला , जल सेनेतला , वायू सेनेतला प्रत्येक जवान असू द्या ज्याला कुठलाही जात धर्म पंथ नसतो त्याच्या हृदयात फक्त भारत असतो .....
  
    संदीप ठोक सारख्या हजारो शहीद जवानांना सलाम आणि भारताच्या प्रत्येक जवानाला  ही छाती ठोक पणे सलाम जो आज आणि आताही दिवस रात्र आकाश एवढा विश्वास स्वतःच्या मनात ठेऊन आणि हिमालया इतकी छाती घेवून भारत मातेच्या आणि तिच्या नागरिकांच्या रक्षणासाठी  देशाच्या सीमेवर उभा आहे ...

:   जय हिन्द   :   जय भारत    :  जय जवान    :



: मंगेश सा सोनवणे ( नाशिक ) : ८८०६६७४२५७  :

Thursday, 7 January 2016

समीकरण आयुष्याचं

प्रिय जनांनो ,

आज काल आयुष्यात काय चाललंय हे काही सध्या समजतचं नाहीये ???


              असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाच असेल. कधी स्वसंवाद साधताना तर कधी मित्रांसमोर मन मोकळं करते वेळी , साहजिकच आहे हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक घडीवर.....  अशावेळेस साथ देते फक्त आपले मन आणि आपले विचार... फक्त सकारत्मक विचार कमी पडता का हो... तर नाही त्या विचारांची कृती ती सकारात्मकता प्रत्यक्ष अस्तित्वात आणते.

    " चांगला विचार + चांगली कृती + चांगला असलेला स्वतः वरचा विश्वास = यशस्वी आणि तणावमुक्त आयुष्य "
हे समीकरण आयुष्याची बांधून घ्यायला हरकत नाही.
            
      नैराश्य आणि दुःख या गोष्टी आयुष्याच्या वाजबाकीत जमा कराव्यात आणि सांगड घालावी ती फक्त सकारत्मक विचारांच्या गुणाकाराची.....
            
      आयुष्य सुंदर आहे जगून पहा , एकदा स्वतःशीच हसून पहा , आपण इतरांना ओळखतो पण एकदा स्वतःला ओळखून पहा, विश्वास ठेवा स्वतःवर पावलोपावली .... आणि जगा एक परिपूर्ण आणि स्वछंद श्वासांचे आनंदमयी आयुष्य.....




: मंगेश साहेबराव सोनवणे.
८८०६६७४२५७