Monday, 24 October 2016

उरी हल्ला : सर्जिकल स्ट्राईक आणि राजकारण ; सिनेसृष्टी

उरी हल्ला : सर्जिकल स्ट्राईक आणि राजकारण ; सिनेसृष्टी
  
     १८ भारतीय जवान उरी हल्ल्यात शहीद झाले . नामर्दांची औलाद म्हणवणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या नामर्दंगी मधून जन्माला आलेल्या काही मुठभर आतंकवादयानि भारतमातेच्या लेकरांची हत्या ती लेकर झोपेत असतांनाच केली .....
     
     गाव खडांगळी , तालुका सिन्नर , जिल्हा नाशिक .... उरी हल्यात शहीद झालेल्या एका वीर सैनिक संदीप ठोक या जवानाच गाव  ....
     
     एस्क्लीझीव्ह आणि ब्रेकिंगच्या विळख्यात हातात कॅमेरा घेवून संदीपच्या २० x ३० च्या घराच्या अंगणात आईचे हृदय फोडणारे चित्कार .... घरट्यातून पाखरू हरवल्याचा जाणीव असलेल्या बापाच्या डोळ्यातलं स्वतःच अनाथ पण .... चांदण गमावण्याची बहिणीची भावना तिची आर्त हक संदीपला किती ही वेळा देवून सुद्धा कधीही न परतणाऱ्या त्या संदीप च्या  अंतःसंस्काराचे त्या न्यूज वाले म्हणवणार्यांसाठी चित्रीकरण करण  नजर मारून , जाणीवा गोठवून स्वतःची लाचारीच समजत होतो ....  क्षमा असावी संदीप .....
   
     उरी घटने नंतर भारताने चोख प्रतिउत्तर सर्जिकल स्ट्राईक च्या मध्यमातून दिल आणि पाकिस्तान च्या फौजेला तोंडघशी पाडल  आणि त्यांच्या तुकड्यांवर वाढणाऱ्या आतंकवाद्यांचा बिमोड करून आपल्या शहीद जवानांना खरी श्रद्धांजली वाहिली , पण वैचारिक पातळी आणि मानसिकता ढासळलेले मुठ भर राजकारणी खरच अभिमान करता येईल अशा गोष्टीवर राजकारण करून सैन्य दलाच्या चिंधड्या करण्यात मौज मानत होते , हा तर सत्तेच्या खुर्चीवर बसून स्वतःचे बुड सुजवून घेणाऱ्या राजकार्नायांचा निर्लज पणाच म्हणावा लागेल , अरे अशा राजकारण्यांना रात्रीच्या सोमरसा च्या बैठकीत ह्या बद्दल राजकारण करण्यापेक्षा रात्रीच्या सोम प्रकाशात सीमेवर छाती तानून उभे असलेल्या सैनिकांच्या पाठीशी बलदंड इच्छा शक्तीने उभे रहा किंवा प्रत्येक राजकारण्याच्या संपत्तीचा १० % तरी खर्च तिन्ही सैन्य दलाच्या विकासाच्या आणि आधुनिकतेच्या मागे लावून तुम्ही तुमची छाती त्या सैनिकां प्रमाणे ५६ इंचाची करून पहा म्हणजे तुम्ही खरे देशभक्त आणि देशहिताचे राजकारणी ठराल यात दुमत नाही हो .... सर्जिकल स्ट्राईक चे राजकारण करण्या पेक्षा देशहिताच्या आणि सर्वात महत्वाच म्हणजे देशाच्या सीमेवर उभे असनाऱ्या सैनिकांबद्दल स्वतःच्या मनाचे सर्जिकल स्ट्राईक करून पहा , नाही तुम्हाला शहीद सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची जाणीव झाली तर यात वावग ठरणार नाही किंवा तुम्हाला कुठलाही कमी पणा येणार नाही हो त्यात .... एकदा तरी लाहौर भारतीय सैन्याच्या हातात देणारे लालबहाद्दूर शास्त्री बना भलेही तुमची मूर्ती लहान नसेलही पण कीर्ती महान होईल आणि राजकारणी असल्याचे तुमचे जीवन सफल तरी होईल यात शंका नाही हो खरच यात शंका नाही ....
   
     ' खंडणीचे ५ कोटी सैनिक सहाय्यता निधी म्हणून मान्य नाही .... ' अतिशय बरोबर विधान आहे हे . प्रथम विरोध मग मांडवलीच कि हो ही ... देशाचे १८ जवान शहीद झाले तरी पाकिस्तानच्या कलाकारांना घेवून बनवण्यात आलेल्या ' ए दिल है मुश्कील ' ह्या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरला स्वतःच्या गालात चपराक का नाही बसावी इतकी विवेक शून्यता किंवा स्वतः चित्रपटा साठी खर्च केलेल्या स्वतःच्या पैशांचा इतका मोह का त्याला पडावा ? १८ शहीद झालेल्या जवानांचे नुकसान देश सहन करू शकतो त्यांचे घरचे सहन करू शकतात पण तुम्ही तुमच्या एका चीत्रपटाचे नुकसान सहन करू शकत नाही ? पण तुम्ही तुमचे स्वतःचे चित्रपट प्रदर्शित न करून पाकिस्तानला त्यांची जागा  तुम्ही नाही दाखवून देवू शकत का ? इतकी का जवानांच्या बलिदानाची घोर उपेक्षा ही करावी तेवढी कमीच हो तुमच्या कडून .. ??? पाकिस्तानातल्या कलाकारांना भारतात आणणारे तुम्हीच त्यांना काम देणारे ही तुम्हीच अरे षंढां नो भारतीय कलाकार तुम्हाला काय फळत नाही म्हणून पाकिस्तानी कलाकार त्यांचा देश चांगला वाटायला लागलाय का तुम्हाला ? चित्रपट प्रदर्शित नसता केला तर निदान शहीद जवानांची लाज राखली असती हो तुम्ही ....
  
     कलाकारांना आणि त्यांच्या कलेला जात धर्म देश काही ही नसतो असे सांगणारे चित्रपट सृष्टीतल्या काही दिग्गज कलाकारांना हा विचार का पडत नाही कि हिंदुस्तान च्या दाही दिशांना छाती ठोक पणे उभा असलेय्या सैनिका ला पण जात धर्म पंथ नसतोतरी तुम्ही त्यांच्या बलिदानाची उपेक्षा करीत आहात ५ कोटी देवून , अरे ते ५ कोटी देवून तुम्ही त्यांचे बलिदान काय विकत घेत  आहात काय ? हीच किंमत लावलीय तुम्ही शहीद जवानांनच्या बलिदानाची ? त्यांच्या घरच्यांच्या अश्रूंनाही चटके दिलेत तुम्ही .... हीच भावना आज जनसामान्यांच्या मना मनात आहे आज तुमच्या बद्दल .... ५ कोटींची मांडवली करण्या अगोदर आमचा अभिमान असलेल्या संदीप ठोक च्या घरी येवून जरा चित्र बघितले असते तुम्ही ते बर झाले असते ... स्वतःचा २५ वर्षाचा मुलगा आईने देशासाठी दिला तिच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिम्मत नाही हिणार तुम्हाला ... वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार देण्याची ही हिम्मत नाही होणार तुम्हाला .... बहिणीचे अश्रू पुसण्याची ही हिम्मत नाही होणार तुम्हाला कारण कि करण ती आई दुखातून सावरलेली नाही महिना उलटून जातोय तरी , वडीलांना विश्वास बसत नाहीये कि माझा २५ वर्षाचा  संदीप शहीद झालाय म्हणून , बहिणीला भावाचा भास झाल्या शिवाय रहावत नाहीये अजून , तरी पण एक अभिमान आहे त्यांना कि संदीप ला आम्ही भारत देशासाठी दिलाय याचा आणि तुम्ही ५ कोटींमध्ये या सगळ्याचं मोल करताय स्वतःच्या स्वार्थासाठी !!! धिक्कार आहे तुमच्या अश्या वागण्याचा जो अशा प्रकारची विकृती मनात ठेवून जगतो आणि वागतो . १८ शहिद जवानां पुढे १ पाकिस्तानी कलाकार असलेला तुम्हाला तुमचा ' ए दिल है मुश्कील  ' महत्वाचा वाटतो का ? पण एक लक्षात ठेवण तुमच्याही  गरजेच आहे , तुमच्या अशा विकृत मनाने दिलेल्या  आणि साकार केलेल्या या तुमच्या विकृत कृतीला संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण देश विसरणार नाही ,इथून पुढचे तुमचे ' ये दिन है मुश्कील ' हे म्हणण्याची वेळ सुरु झालीये ....
   
     आज जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला हा आपला भारत देश आहे , तमाम भारतीय युवकांना इतकेच आवाहन आहे कि , ह्या ५ कोटींची मांडवली करणाऱ्या आणि त्यांच्या सोबत त्यांचे साथ देणाऱ्या स्वार्थी आणि ढिल्या पुल्या षंढ मनोविकृतीना इथून पुढे थारा देवू नका , शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची जाणीव ठेवा हजारो लाखो संदीप ठोक स्वतःच्या विचारांनी आणि हिमतीने स्वतःत उतरावा फक्त देशासाठी आणि देशहितासाठी ... मायावी आणि भुरळ पडणाऱ्या सिने सृष्टीतील कलाकारांना  IDOL आयुष्यात ठेवण्यापेक्षा आपले IDOL हे स्थल सेनेतला , जल सेनेतला , वायू सेनेतला प्रत्येक जवान असू द्या ज्याला कुठलाही जात धर्म पंथ नसतो त्याच्या हृदयात फक्त भारत असतो .....
  
    संदीप ठोक सारख्या हजारो शहीद जवानांना सलाम आणि भारताच्या प्रत्येक जवानाला  ही छाती ठोक पणे सलाम जो आज आणि आताही दिवस रात्र आकाश एवढा विश्वास स्वतःच्या मनात ठेऊन आणि हिमालया इतकी छाती घेवून भारत मातेच्या आणि तिच्या नागरिकांच्या रक्षणासाठी  देशाच्या सीमेवर उभा आहे ...

:   जय हिन्द   :   जय भारत    :  जय जवान    :



: मंगेश सा सोनवणे ( नाशिक ) : ८८०६६७४२५७  :

2 comments:

  1. यांमध्ये आपण एकच करू शकतो, त्या चित्रपटाचा ५ कोटि काय ५०० रूपये सुद्धा बिझनेस होऊ द्यायचा नाही. त्यावेळी राजकारणी तसेच बॉलीवुडला समजेल कोण महत्वाचे त्याशिवाय डोळे नाही उघडणार.

    ReplyDelete
  2. यांमध्ये आपण एकच करू शकतो, त्या चित्रपटाचा ५ कोटि काय ५०० रूपये सुद्धा बिझनेस होऊ द्यायचा नाही. त्यावेळी राजकारणी तसेच बॉलीवुडला समजेल कोण महत्वाचे त्याशिवाय डोळे नाही उघडणार.

    ReplyDelete